वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

 1 हजार 26 पोलीस अधिकारी व कर्मचारी

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम   

 1 हजार 26 पोलीस अधिकारी व कर्मचारी

एक एसआरपीएफ तुकडी  

 पंढiरपूर दि.31:- चैत्र शुद्ध एकादशी 02 एप्रिल 2023 रोजी असून, या चैत्री यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

 चैत्री वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 01 हजार 26 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 03 पोलीस उपअधिक्षक, 12 पोलीस निरिक्षिक, 44 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 389 पोलीस कर्मचारी व 479 होमगार्ड व एसआरपीएफ कंपनीची तुकडी नियुक्त करण्यात आली आहे. तसेच वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी 02 पोलीस निरिक्षक व 97 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहा ठिकाणी वॉच टॉवर व 130 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी 10 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असल्याचेही श्री.कदम यांनी सांगितले. भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केले आहे. 

भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी सहा औषधोपचार केंद्र

 तालुका आरोग्य अधिकारी -डॉ.एकनाथ बोधले   

 सुसज्ज 6 रुग्णवाहिका, 120 आरोग्य अधिकारी कर्मचारी

 पंढरपूर दि.11:- चैत्री यात्रेमध्ये पंढरपूरात येणारे भाविक आरोग्यसंपन्न रहावे. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा असून, भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी 6 ठिकाणी औषधोपचार केंद्र उपभारण्यात आले असून, त्यामध्ये 120 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देण्यात आहे. तसेच शहरात 7 ठिकाणी सर्व सुविधायुक्त 6 रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ यांनी दिली. 

 चैत्री यात्रेच्या कालावधीत आरोग्याची आवश्यक काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका आरोग्य विभाग तसेच तालुका आरोग्य विभागाकडून पत्राशेड, वाळवंट, दर्शन मंडप, पोलिस संकुल, ६५ एकर, गोपाळपूर येथे औषधोपचार केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार रक्तपेढीची सोय करण्यात आलेली आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णासआरोग्यसेवा देण्यास तत्पर आहे. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेड, आयसीयू विभाग तयार करण्यात आला असल्याचे डॉ. बोधले यांनी सांगितले.