स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युवा आघाडीचे प्रवक्ते रंजीत बागल यांचे डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युवा आघाडीचे प्रवक्ते रंजीत बागल यांचे डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युवा आघाडीचे प्रवक्ते रंजीत बागल यांचे डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

ओरिजिनल मुख्यमंत्र्यांना वेळ नाही,डमी शिंदे साहेब तुम्ही तर शेतकरीप्रश्नांवर मार्ग काढा.. स्वाभिमानी युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांचे डमी मुख्यमंत्र्यांना निवेदन..

दि.13 सप्टेंबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राजकीय दौर्‍यांमध्ये व्यस्थ आहेत. त्यांना मंत्रीमंडळ बैठका घेण्यास पंधरा पंधरा दिवस वेळ मिळत नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास अडचणी येत आहेत. आता याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे डमी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेले पंढरपूर येथील पांडुरंग शिंदे यांना प्रतिकात्मक निवेदन दिले आहे..

यावेळी बोलताना बागल म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री महोदय सध्या राजकीय दौर्‍यामध्ये प्रचंड व्यस्थ आहेत,त्यामुळे त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांविषयी लक्ष देण्यास कदाचित वेळ मिळत नसावा. मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महत्या करून ही राज्याचे मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत. ते मागच्या पंधरा दिवसांत फक्त गणपती आरत्या आणि आपल्या गटाचे आमदार महोदय यांचेसोबत भोजन कार्यक्रमात व्यस्त आहेत. आज अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे..? म्हणुन आज डमी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिकात्मक पध्दतीने लोकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.

पुढे बोलताना बागल म्हणाले,राज्यात सध्या जनावरांवर आलेल्या लंपी स्कीन रोगाने हाहाकार माजवला आहे,शिवाय राज्यभरात अनेक भागात तीव्र अतिवृष्टी व काही भागात अवर्षण झाले आहे. मात्र पिकविमा कंपनीने पर्जन्यमानात घोळ करून शेतकर्‍यांना पिकविम्यापासुन वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे.याबाबत मुख्यमंत्री महोदय मात्र कठोर नाहीत. ते गंभीर नाहीत म्हणून निदान डमी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यावर तरी ओरिजिनल मुख्यमंत्री दखल घेतील ही अपेक्षा यानिमित्ताने बागल यांनी व्यक्त केली आहे.